Friday, July 12, 2013

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु



निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

मनुची, निकोलाव (१६३९-१७१७).



मनुची, निकोलाव (१६३९-१७१७).

सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून परागंदा होऊन तो लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदाराबरोबर तुर्कस्थान, इराणमधून १६५६ साली भारतात सुरत या ठिकाणी आला. नंतर त्याने मोगल बादशाह शाहजहान याचा मोठा मुलगा दारा शुकोव्ह याच्या तोफखान्यात नोकरी धरली. औरंगजेब व शाह आलम यांच्या पदरीही त्याने काही काळ नोकरी केली. या काळात शिपाईगिरी, वैद्यकीय व्यवसाय व राजनैतिक शिष्टाई इ. विविध प्रकारची त्याने कामे केली .पुढे मोगलांच्या युध्दमोहिमांबरोबर तो दक्षिण हिंदुस्थान, राजस्थान, दक्षिण हैदराबाद इ. प्रदेशात गेला. अशा एका मोहिमेत इ.स. १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्याच्या परिसरात मिर्झाराजा जयसिंहबरोबर तो असताना जयसिंहच्या छावणीत त्याची शिवाजी महाराजांशी भेट झाली होती. त्याला फार्सी व उर्दू भाषांचे तसेच मोगल दरबारातील रीतिरिवाजांचे चांगले ज्ञान होते. भारतातील पोर्तुगीजांच्या वतीने त्याने छत्रपती संभाजीमहाराज व शाह आलम यांकडे शिष्टाई केली होती. उच्च शिक्षणाचा अभाव असूनही मर्यादित वैद्यकीय ज्ञानावर त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू करून अंगाच्या हुशारीने त्यात चांगले यश मिळविले व द्रव्यसंचयही केला. या व्यवसायामुळे त्याचा देशभर संचार झाला. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीच्या वेळी मोगलांच्या कारवायांनकंटाळून तो मद्रास येथे स्थायिक झाला. या सुमारास एलिझाबेथ क्लार्क या विधवेशी त्याने विवाह केला (२८ ऑक्टोबर १६८६) त्यांना एक मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्याची पत्नी १७०६ मध्ये वारली. तेव्हा त्याने आपले वास्तव्य पाँडिचेरीत हलविले, पण अखेरच्या दिवसांत तो पुन्हा मद्रासला आला असावा. कारण मद्रासच्या गव्हर्नरने टॉमस क्लार्कची सर्व संपत्ती त्यास देऊन त्याचा सन्मान केला (१४ जानेवारी १७१२). त्यानंतर तो अखेपर्यत तिथेच असावा.


मद्रासमधील वास्तव्यात (१६८६-१७०६) त्याने आपल्या बहुविध आठवणी फ्रेंच व पोर्तुगीज भाषांत लिहून काढल्या आणि चार विभागांत प्रसिध्द करण्यासाठी त्या पॅरिसला पाठविल्या. या आठवणीत त्याने शिवाजीसह तत्कालीन प्रसिध्द राज्यकर्ते .सेनानी यांची अस्सल प्रसंगचित्रे काढून घेतली होती. त्याला औरंगजेब, पोर्तुगीज आणि जेझुइट यांच्याबद्दल तिटकारा होता. भारतातील शहरी वैभव व ग्रामीण दारिद्र्य यांचे त्याने उत्तम चित्रण केले आहे. धार्मिक बाबीविषयी तो पाल्हाळिक असून वास्तव व काल्पनिकांचे मिश्रण त्याच्या लेखनात आढळते. काही अपवाद वगळता त्याच्या ग्रंथातील स्थल-कालाचे तपशील आणि विधाने ऐतिहासिक दृष्ट्या सामान्यतः विश्वसनीय वाटतात. त्याच्या आठवणींचे पहिले इंग्रजी भाषांतर विल्यम आयर्विन याने स्तोरिआ दो मोगोर या नावाने १९०७ मध्ये प्रकाशित केले. त्याची दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिध्द झाली. मराठीत असे होते मोगल या शीर्षकाने ज.स. चौंबळ यांनी त्याचे भाषांतर केले आहे (१९७४) मोगल काळ आणि मराठ्यांचा इतिहास यांची माहिती देणारा एक उपयुक्त साधनग्रंथ म्हणून मनुचीच्या या आठवणीस आगळे महत्व प्राप्त झाले.

मन हे वेडं असतं



मन हे वेडं असतं
एखादी व्यक्ती आवडली
कि तिच्यावर प्रेम करून बसतं
पण.... मला हे कळत नाही
प्रेम का होतं?
... डोळ्यांतून नेहमी
अश्रू वाहण्यासाठी कि,
हृदयाला सतत
वेदना देण्यासाठी
प्रेम का होतं?
त्या व्यक्तीच्या विरहाने
जीवनाचं रान होण्यासाठी कि,
त्याच व्यक्तीच्या सहवासाने
जीवनात पालवी फुलवण्यासाठी
प्रेम का होतं?
जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत
तिच्या आठवणीने
प्रेमपथावर एकटं चालण्यासाठी कि,
तिच्या सोबतीने नवीन
आयुष्याच्या सूर्योदयाबरोबर
जीवनाची पहाट सजवण्यासाठी
प्रेम का होतं?
कोणी म्हणतं
प्रेम हि जीवनातील
कठोर परीक्षा आहे आणि
त्या परीक्षेत सर्वच
उत्तीर्ण होत नाहीत
मग मला हे कळत नाही
प्रेम का होतं? ? ?

!!..विठ्ठल..!!


!!..विठ्ठल..!!

विठ्ठलाची ओढ किती गोड गोड
जोडूनिया कर फुले मन...

तोच भासे दाता तोची माता-पिता
विसर जगाचा सर्वकाळ...

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिँता व्यथा क्षणार्धात...

सोड अंहकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठल डोळे मिटून..!!

हीच व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी ॥