Sunday, January 22, 2012

|| संभाजी महाराज ||















|| संभाजी महाराज ||
वयाच्या चौदाव्या वर्षी ज्याने लिहिला बुद्धभूषण ग्रंथ
त्या शेर शिवाच्या छाव्याची अजूनही आहे एक खंत
काय म्हणून आम्हाला इतका बदनाम केलात
पानापानागाणीस एकेके वेगळाच अध्याय जोडलात .
...
लेखी तुमच्या पेशवे होते रसिकतेचे दर्दी
मग आम्हाला का ठरवलात तमाशातली गर्दी
आमच्या इतिहासात का आठवते फक्त गोदावरी
विसरून गेलात कि काय क्रूरकर्म्या औरंग्याची स्वारी.

सल आमच्या मनाची कुणीच का नाही जाणली
जिजाऊ पाठी माया ममतेची कधी कुठे मिळाली
आमच्या हरेक शब्दाचा इथे विपर्यास घेतला आहे
पण हा संभाजी बुर्सेठलेल्यांना पुरून उरला आहे.

मुळात आम्ही मर्द मराठे मावळे ,
नव्हतो कधीच माद्यावरची कावळे
हा अख्खा महाराष्ट्र स्वबळावर आम्ही लढवला आहे
प्रत्येक हम्ल्याला मराठमोळा दणका दिला आहे .

इतिहास्कारहो,
लेखणीला जरा आता तरी आवर घाला
कारण सत्य शेवटी सत्य आहे
अन या छाव्यातून वाहते ते
त्या शूर सिंहाचेच सळसळते रक्त आहे...

No comments:

Post a Comment