Tuesday, December 25, 2012

किल्ले वासोटा



 वासोटा (Vasota) किल्ल्याची ऊंची :
4267
किल्ल्याचा प्रकार : वनदुर्ग डोंगररांग: महाबळेश्वर
कोयना
जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील,
कोयना नदीच्या खोर्य़ात, निबिड
अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले
वासोटा’. ज्ञानेश्वरीत
वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’
असा दिला आहे. वासोट्यालाच
’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
हा गड येत असल्यामुळे हा भाग दुर्गम
बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध
बनला आहे..
Vasota
इतिहास :
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध
घेता आपल्याला वसिष्ठ
ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल.
असे मानले जाते की, वसिष्ठ
ऋषींचा एक शिष्य,
अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत
ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला,
सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर
राहण्यास आला व त्याने
आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे
नाव दिले. कालांतराने
या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे
साज चढवून लष्करी ठाणे केले.
त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे
नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.
प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही,
हा किल्ला शिलाहारकालीन
असावा.
शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत
’वसंतगड’ या नावाने
उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा.
मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून
शिवरायांनी जावळी विजयानंतर
वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण
ते खरे नाही जावळी घेताना,
जावळीतील तसेच कोकणातील इतर
किल्ले शिवरायांनी घेतले. पण
वासोटा दूर असल्याने
किल्लेदाराच्या हाती राहीला.
अफझल वधानंतर
काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत
नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर
अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत
मावळातील पायदळ पाठवून
त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून
१६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये
पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व
सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत
ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये
वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये
सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये
पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई
तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात
घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे
सेनापती बापू गोखले यांनी ताई
तेलिणी बरोबर लढाई केली. ताई
तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज
देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये
वासोटा किल्ला बापू
गोखल्यांच्या हाती पडला.
पहाण्याची ठिकाणे :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन दरवाजे लागतात.
यातील
पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
आहे. दुसर्य़ा दरवाजाने गडावर प्रवेश
करता येतो. समोरच मारुतीचं बिन
छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख
तीन वाटा जातात. सरळ
जाणारी वाट किल्ल्यावरील
भग्नावशेषांकडे घेऊन जाते.
उजव्या बाजूस जाणारी वाट
’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. वाटेतच
महादेवाचे सुंदर मंदिर लागते. मंदिरात
दोन ते तीन जणांची राहण्याची सोय
होऊ शकते. येथून पुढे जाणारी वाट
माचीवर घेऊन जाते.
या माचीला पाहून
लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते.
या माचीलाच काळकाईचे ठाणे
म्हणतात. या माचीवरून
दिसणारा आजुबाजूचा घनदाट
झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव,
रसाळ, सुमार, महिपतगड,
कोयनेचा जलाशय हा संपूर्ण
देखावा मोठा रमणीय आहे.
मारुतीच्या देवळाच्या डावीकडे
जाणारी वाट आपल्याला जोड
टाक्यांपाशी घेऊन जाते.
या टाक्यातील
पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे
ही वाट जंगलात शिरते
आणि बाबुकड्यापाशी येऊन पोहोचते.
या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’
अक्षरा सारखा आहे. याला पाहून
हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण
येते. समोरच उभा असणारा आणि आपले
लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच
‘जुना वासोटा’ होय.
जुना वासोटा
नव्या वासोट्याच्या बाबुकड्यावर उभे
राहिल्यावर समोरच
उभा असणारा डोंगर म्हणजे
जुना वासोटा. आता या गडावर
जाणारी वाट अस्तित्वात नाही.
तसेच पाण्याचाही तुटवडा आहे. घनदाट
झाडे व वन्यश्वापदेही असल्याने
सहसा येथे कोणी जात नाही.
पोहोचण्याच्या वाटा :
वासोटा किल्ल्यावर
जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.
एक सातारामार्गे आणि दुसरा थेट
नागेश्वर मार्गे वासोट्याकडे
१) सातारामार्गे वासोटा :- खालील
तिनही मार्गाने जातांना प्रथम
कोयना धरणाचा " शिवसागर जलाशय
" बोटीने पार करावा लागतो.
अ) कुसापूर मार्गे :-
सातार्याहून
बामणोली या गावी यावे. सकाळी ९
वाजता सातार्याहून बसची सोय आहे.
येथून
कुसापूरला कोयना धरणाचा जलाशय
लाँचने पार करून जाता येते. कुसापूरहून
दाट जंगलात दोन वाटा जातात.
उजवीकडे जाणारी वाट आठ
मैलांवरील नागेश्वराकडे जाते. तर
डावीकडे जाणारी वाट वासोट्यावर
घेऊन जाते.
ब) खिरकंडी मार्गे:-
सातार्याहून बसने ’वाघाली देवाची’
या गावी यावे. येथून
लाँचच्या सहाय्याने जलाशय पार करून
खिरकंडी या गावी यावे. येथून धनगर
वाडी पासून जाणारी वाट ’मेट
इंदवली’ या गावात घेऊन जाते.
सातार्याहून इथवरचा प्रवास आठ- नऊ
तासांचा आहे. येथून पुढे पाच -
सहा तासात वासोट्यावर जाता येते.
क) महाबळेश्वर मार्गे :-
महाबळेश्वरहून ‘तापोळे’ गावी येऊन
लाँचने कुसापूर गाठता येते, आणि तेथून
(अ) मध्ये सांगितलेल्या रस्त्याने
वासोटा गाठावे.
२) चिपळूणहून वासोटा :-
ड) चिपळूणहून सकाळी ८.३०
वाजताच्या बसने ‘चोरवणे’
या गावी यावे. येथून ५ ते ६ तासात
वासोट्याला पोहोचता येते. या मार्गात
वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे
आपल्याकडे पाण्याचा भरपूर
साठा घेऊन जावे. या वाटेने वर गेल्यावर
एक पठार लागते. पठारावरून डावीकडे
जाणारी वाट नागेश्वरकडे तर
उजवीकडची वाट वासोट्याला जाते.
येथे नागेश्वराकडे जाणार्य़ा वाटेने थोडे
पुढे गेल्यावर खाली एक वाट जंगलात
विहिरीकडे जाते. येथून वासोट्याचे
अंतर दोन तासात कापता येते.
ई) चिपळूणहून ‘तिवरे’ या गावी यावे,
येथून रेडे घाटाने
वासोट्याला जाता येते.
फ) नागेश्वरमार्गे वासोटा :-
नागेश्वरला भेट दिल्याशिवाय
वासोट्याची भेट पूर्ण होऊच शकत
नाही. वासोट्यावर जाताना समोरच
एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो,
त्यालाच नागेश्वर म्हणतात.
या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून,
तेथे महादेवाचे मंदिर आहे.
हजारो नागरिक दर
शिवरात्रीला या पवित्र
स्थानी दर्शनास येतात.
गुहेच्या छतावरून बाराही महिने
पाण्याच्या थेंबांचा अभिषेक
शिवलिंगावर होत असतो. बहुतेक
ट्रेकर्स प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन मग
वासोट्याला जातात. त्यासाठी फक्त
लांबचा पल्ला चालण्याची तयारी असावी लागते.
राहाण्याची सोय :
१)
पूर्वी उल्लेखिलेल्या नव्या वासोट्यावरील
महादेवाच्या मंदिरात २ ते ३
जणांची राहण्याची सोय होते.
२) नव्या वासोट्यावर जोड
टाक्यांच्या शेजारील
पठारावरही राहता येते.
३)
नागेश्वराची गुहा ही राहण्यासाठी उत्तम
जागा आहे. येथे २० ते २५ जण आरामात
राहू शकतात.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय आपण स्वतच करावी
पाण्याची सोय :
नागेश्वराच्या गुहेकडे जातांना,
पायर्य़ांच्या उजवीकडून जंगलात
जाणारी वाट
पाण्याच्या विहीरीपाशी घेऊन
जाते. नव्या वासोट्यावरही मुबलक
प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.
उन्हाळ्यातही या विहिरीला पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
कुसापूर मार्गे ४ तास लागतात , चोरवणे
मार्गे ७ तास लागतात.
सूचना :
१) वासोट्याला पावसाळ्यात
जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर
त्रास होतो, तेव्हा आवश्यक
ती काळजी घ्यावी,
२) चिपळूणहून चोरवणे मार्गे
वासोट्याला जाताना वाटेत
पाण्याची कुठेही सोय नाही,
तेव्हा पाण्याचा पुरेसा साठा जवळ
बाळगणे आवश्यक आहे,

Friday, December 21, 2012

संत तुकाराम




संत तुकाराम
हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी'जगद्‌गुरु'म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी -'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय'असा जयघोष करतात.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात ’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.

‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूत ी त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. जगत गुरु संत तुकाराम महाराज, हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे गुरु आहेत

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्य े मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबारायांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात आपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक दु:खे सहन करावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली, या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारांमांचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. पण त्या बुडालेल्या गाथा तेरा दिवसांनी नदीतून परत वर आलेल्या पाहून रामेश्वर भटांना पश्चात्ताप झाला व त्यांनी तुकारामांचे शिष्यत्व पत्करले.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो

Monday, October 22, 2012

निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ऐतिहासिक कामगिरी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी...
सिद्दी हिलाल
घोडदळातील सेनापती सहाय्यक
पन्हाळगडाच्या वेढ्यात (२ मार्च १६६०) शिवरायांच्या सुटकेसाठी युद्ध केले.
उमराणीजवळ बहलोल खानाशी लढून (१५ एप्रिल १६७३) त्याला शरण येण्यास भाग पाडले.
सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलालचा पुत्र)
घोडदळातील सरदार
सिद्दी जोहरशी झालेल्या लढाईत जखमी (२ मार्च १६६०) आणि कैद.
सिद्दी इब्राहिम
शिवाजी महाराजांचा अंगरक्षक, लष्कराचा हजारी, फोंड्याचा किल्लेदार
अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांचा अंगरक्षक म्हणून त्याने कामगिरी (१९ नोव्हेंबर १६५९) चोख पार पाडली.
सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला घेतला (एप्रिल १६७५) आणि त्यावर स्वराज्याचे निशाण फडकावले.
नूरखान बेग
स्वराज्याचा पहिला सरनोबत
२१ मार्च १६५७ रोजी स्वराज्याचा पहिला सरनोबत होण्याचा मान पटकावला.
दिड लाखाच्या सैन्याचे नेतृत्व करण्याची कामगिरी चोख पार पाडली.
मदारी मेहतर
विश्वासू सेवक
आग्रा येथील बंदीवासातून पळण्यासाठी (१७ ऑगस्ट १६६६) शिवरायांना सर्वतोपरी मदत.
काझी हैदर
शिवाजी महाराजांचा वकील आणि सचिव
१६७० पासून १६७३ पर्यंत शिवाजी महाराजांचा वकील म्हणून काम पाहिले.
खास सचिव आणि फारसी पत्रलेखक म्हणून काम पाहिले.
शमाखान
सरदार
कोंढाणा किल्ला स्वराज्यात येताच (फेब्रुवारी १६७०) आसपासचे मोगलांचे किल्ले आणि ठाणी जिंकूनघेतली.
सिद्दी अंबर वहाब
हवालदार
जुलै १६४७ मध्ये कोंढाणा सर करताना मोठा पराक्रम गाजवला
हुसेनखान मियाना
लष्करातील अधिकारी
मसौदखानाच्या अदोनी प्रांत हल्ला करुन उध्वस्त केला.
बिळगी, जामखिंड, धारवाड (मार्च १६७९) जिंकले.
रुस्तमेजनमा
शिवाजी महाराजांचा खास मित्र
विजापूर येथील गुप्त बातम्या पाठवण्याचे काम चोख पार पाडले.
हुबळीच्या लुटीत कामगिरी (६ जानेवारी १६६५) चोख पार पाडली.
नेताजी पालकर यांना मदत (१८ मार्च १६६३) केली.
सिद्दी मसऊद चालून येत असल्याचे पाहून शिवाजी महाराजांना सावध केले.
दर्यासारंग
आरमाराचा पहिला सुभेदार
खांदेरीवर १६७९ मध्ये विजय मिळवला.
बसनूर ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात लुटले.
इब्राहीम खान
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९) आणि बसनूरच्या ७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी १६८५ या काळात झालेल्या लढाईत परक्रामकेला.
दौलतखान
आरमाराचा प्रमुख (सुभेदार)
उंदेरीवर हल्ला (२६ जानेवारी १६८०)
खांदेरीच्या लढाईत पराक्रम (१६७८)
सिद्दी संबुळचा पराभव (४ एप्रिल १६७४)
सिद्दी मिस्त्री
आरमारातील अधिकारी
खांदेरी (१६७९), उंदेरी (१६८०), सिद्दी संबुळविरुद्धच्य ा लढाईत (१६७४) पराक्रम गाजवला.
सुलतान खान
आरमाराचा सुभेदार
शिवाजी महाराजांच्या काळात अधिकारी आणि १६८१ मध्ये सुभेदार.
दाऊतखान
आरमाराचा सुभेदार
अनेक आरमारी लढायांमध्ये पराक्रम गाजवला.
सुलतान खान नंतर सुभेदार झाला.
पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळवण्यात यशस्वी झाला.
इब्राहिम खान
तोफखान्याचा प्रमुख
स्वराज्यातील तोफखान्याचा प्रमुख.
डोंगरी किल्ल्याच्या लढाईमध्ये तोफखान्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
विजापूर आणि गोवळकोंड्यावरुन स्वराज्यात आलेले ७०० पठाण
पायदळ आणि घोडदळ
१६५८ पासून स्वराज्याची निष्ठापूर्वक सेवा केली. अखेरपर्यंत बेईमानी केली नाही.
घोडदळातील चार मोगली पथके
घोडदळातील सरदार आणि सैनिक
मोगलांना सोडून २६ ऑक्टोबर १६७२ मध्ये आलेल्या या वीरांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केली.

पेटून उठेल एकेक कण

''मी हरलो म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण.. पुन्हा जग जिंकण्यासाठी, येतील कितीतरी क्षण...
एकटा उरलो म्हणू नकोस...!!!

''सध्या एकटा आहे म्हण..आयुष्य संपले नाही अजून, भेटतील किती तरी जण...!!!

''मी थकलो म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण.. पुन्हा झेप घेण्यासाठी, पेटून उठेल एकेक कण...!!!

महाराष्ट्र राजा

महाराष्ट्र स्फुरला । महाराष्ट्र स्मरला । महाराष्ट्र स्वरला । अभंगवाणी ॥

महाराष्ट्र मावळ्यांत। महाराष्ट्र पेशव्यांत। महाराष्ट्र मराठ्यांत।शौर्यकहाणी॥

महाराष्ट्र शोधावा महाराष्ट्र राजा।महाराष्ट्र सर्जा । महाराष्ट्र गर्जा ।ठायीठायी॥

छत्रपती सरफोजी राजे भोसले ,तंजावर..!

          
छत्रपती सरफोजी राजे भोसले ,तंजावर..!
छत्रपती फक्त लढाया आणि गनिमी काव्यातच तरबेज नव्हते तर विद्येच्या क्षेत्रात ही एका छत्रपती ने अमूल्य अशी कामगिरी केली आहे.दुर्दैवाने ज्ञानार्जानाकडे दुर्लक्ष केलेल्या मराठ्यांनी या पंडित आणि निष्णात वैद्यक अश्या या छत्रपती कडे पण दुर्लक्ष केल आहे.
मोतीबिंदू च्या शस्त्रक्रियेचा शोध फ्रेंच वैद्यक Dr. Jacques Davie यांनी १७५२ साली लावला..
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही त्या वेळी एक चमत्कार मानली गेली.याच पद्धतीचा अवलंब करून भारतामध्ये ही काही ब्रिटीश,फ्रेंच नेत्र तज्ञ काम करत होते..
आणि त्या बरोबरच एक भारतीय ही होते ते म्हणजे प्रसिद्ध नेत्र विशारद तंजावर चे महाराजा सरफोजी भोसले (१७७७-१८३२).महा राज हे एक निष्णात वैद्यक होते.महाराज फक्त औषधपचारच करत नव्हते तर चक्क मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया देखील करत असत.त्या वेळेस photography नव्हती तरी महाराज चित्रकारांकडून पेशंट च्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर ची चित्रे काढत असत.
सरफोजी महाराजांनी धन्वंतरी महाल बांधला..येथे आयुर्वेद,युनानी यावर संशोधन चाले.महाराजांनी 'सर्बेन्द्र वैद्य मुरेगल'नावाचा वैदक शास्त्रावरील ग्रंथ लिहिला .तीर्थयात्रेला गेल्यावर देखील महाराज आपल्या जवळ वैद्यक उपकरणे घेऊन जात असत.

सरफोजी महाराज स्त्री मुक्तीचे पुरस्कर्ते होते.त्यांनी स्त्री शिक्षकांची नेमणूक केली.सहिष्णू वृत्तीच्या या राजाने कित्येक ख्रिस्चन मिश्नारीच्या शाळांना आणि तंजावर च्या बडे हुसेन दर्ग्याला मदत केली.

संस्कृत ,फ्रेंच, इंग्लिश latin ,Italian ,जर्मन,Danish ,ग्रीक आणि तमिळ,तेलगु कन्नड मराठी भाषा अवगत असणाऱ्या विद्वान अश्या या राजाने
'सरस्वती महाल'नावाचे वाचनालय जगभरातील ग्रन्थ आणून समृद्ध केले.या संग्रहालामध्ये वेदांत,व्याकरण, औषधशास्त्र ,संगीत,नाटक,नृत ्य,स्थापत्य शास्त्र आणि खगोल शास्त्र या विषयांवरील अनेक ग्रंथ तसेच कित्येक नकाशे आणि dictionaries त्यांनी जमवल्या .दक्षिण भारतातील पहिला देवनागरीतील छापखाना महाराजांनी उभा केला.
महाराजांनी'नवविद्या कलानिधी शाळा'बांधली जेथे भाषा,साहित्य आणि विज्ञान यांचा अभ्यास चाले.महाराज Royal Asiatic society चे सदस्य देखील होते.

संगीतामध्ये देखील सरफोजी राजांनी अमूल्य योगदान दिले.'कुमारसंभव चम्पू','मुद्रार ाक्षसछाया',आणि'देवेंद्रकुरुंज ी'या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले.कर्नाटकी संगीता मध्ये clarinet आणि violin चा वापर त्यांनी केला.
महाराजांनी तंजावर पासून जवळच मनोरा इथे शिपयार्ड बांधले.तसेच एक नौदल अभ्यास केंद्र, हवामान संशोधन केंद्र आणि बंदुकीचा कारखाना देखील बांधला.

इतक्या चतुरस्त्र अश्या विद्वान राजा ला दुर्दैवाने महाराष्ट्रात कोणीच ओळखत नाही.इतिहासाच्य ा अभ्यासकांनी याची दाखल घ्यावी हीच अपेक्षा.
कमीत कमी मराठा नावावर संघटना बांधाणारांनी ,राजकारण करणारांनी तरी या राजाची दाखल घ्यावी आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा.
छ.शिवराय ,छ.संभाजी आणि राजर्षी शाहून सोबतच हा आणखी एक छत्रपती सर्वांचे स्फूर्ती स्थान ठरावेत हीच अपेक्षा..!
या दुर्लक्षित विद्वान छत्रपतीला शतशः आभार आणि प्रणाम..!

kabardar jar tach maruni jal pudhe




savalya :  kabardar jar tach maruni jal pudhe chindhadya
udvin raiee raiee yewadya !
kunya  gavache patil aapan kuthe chalala ase
sheev hi olandun tirase?
lagam khecha ha ghodicha rao tang takuni
ase ya tumhi khadya aangani!
por  mahnuni hasnywari vel naka neu hi
mala ka oolkhale tumhi?
ha  mard maratycha me baccha ase
he had hi maze lechepechenase
ya nasanasatun himat baji vase
kabardar jar tach maruni jal pudhe chindhadya
udvin raiee raiee yewadya !

swar:     malyat jaun moteche te pani bharave tuwa
kashala tata tuj ha hawa?
muthit jyachya muth ase hi khadgachi to bare
veer tu samjalas kai re?
thor  marisi asha badhya parakramachi jari
kuthe tav bhala barachi tari?
he khadgache bagh pate kiti chamakatat
anukuchidar  ati bhalyache tok te
ya pudhe tuzi wad himaat ka rahate?
kabardar jar tach maruni jal pudhe chinddya
udvin rai rai yewadya !

savalya apan mothe dadiwale aha shur veer ki-
kiti te aamhala thauki!
tdaf aamuchy shivbachi tumha mahiti na ka?
daviti fusharaki ka fuka ?
tumha sarkhe kiti lolvile narmani
aamuchy shivbane bhar rani
me ase imani chela tyanche kade
hukumavin tyancy samaja yache pudhe
dei n jau me shur veer fakade
punha sangto,
kabardar jar tach maruni jal pudhe chindhadya
udvin rai rai yewadya !
               
lal bhadak te wadan jahale balache mag kase
swar pari mani halu ka hase?
tya balachya nayani chamke pani tweshamule
swar pari soumya drustine khule
chandra  dise janu ik, dusra tapato ravi ka tar
aika shivbache he swar-
aahes emani maza chela khara
chal inam ghe ha maza shela tula
pan bol savalya bol punha ikada
khabrdar jar tach maruni jal pudhe chindhdya
Udvin raiee raiee yewadya !


Wednesday, August 15, 2012

!! राष्ट्रगीत !!

!! राष्ट्रगीत !!

जन गण मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंधू गुजरात मराठा
द्राविड उत्कल वंग
विंध हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधी तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तब जय गाथा
जन गण मंगल दायक जय है
भारत भाग्य विधाता
जय है,जय है,जय है ,
जय,जय,जय,जय है ..!!

आपणा सर्वांना ६५ व्या स्वतंत्रता दिवसाच्या मनपूर्वक शुभेछ्या !!
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या अनेक क्रांतीकारकांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!

!! जय हिन्द जय भारत !!
!! जय महाराष्ट्र !!

Tuesday, July 3, 2012

दबंग..

उसने क्या जाना था किस तुफान से पडा है पाला..
जिते होंगे देश कई मै तो दिलोको जितनेवाला..
कहा जित पाया मुझे मारकर औरंग..
मरकर जिंदा रहे वो है सबसे बडा दबंग..।।
जब जब मै याद आयातबतब हिंदुस्थान रोया..
सोचो जरा मरहठ्ठोने क्या खोया और क्या पाया..
पुछ लेना उसे बतायेंगा वो वधस्थंभ..
फौलाद पिघला दे जंजिरोका वो है सबसे बडा दबंग..।।
कैद मे पकड शैतानोने जखडा था..
आलमगीर कहलानेवाला सामने आने से डरता था..
देख मुझे सामने कापं उठा उसका अंग अंग..
जिसका कभी नही झुकता सर वो है सबसे बडा दबंग..।।
झुक नही सकता किसीके सामने..
ऐसे तुफाण पालते है सिनेमे..
पाव रखदे अगर तिलमिला जाये मैदान ए जंग..
जिंदगी को जो रण बनाये वो है सबसे बडा दबंग..।।
शोला बनके टकराया पिघल गया जंजिरा..
समंदर भी तेवर बदले देख अंदाज मेरा..
लहरोसे उठ गयी दहकते शोलो कि तरंग..
ठहरा दे समंदर का पाणि वो है सबसे बडा दबंग..।।
ये दुनिया मरहठ्ठोकि दिवानी है..
धरतिपर एक हि ऐसी कहानी है..
अपने बलिदान से कर दिय जिसे बुलंद..
मौत मरजाये देख जिसे वो है सबसे बडा दबंग..।।
मौतसे मौत का खेल खेला है..
दर्द कि सिमावोको इंतेहा तक झेला है..
जबान जिसकि कटकर भी कहे जगदंब..
टुकडो मे बटा स्वराज्य के लिये वो है सबसे बडा दबंग..।।
गद्दारो के घाव सिने पे झेले है..
अपने समजकर आस्तिनके साप पाले है..
शत्रु के खुनसे जो धरती को कर देबेरंग..
भगवे का दर्द सिने मे जले वो है सबसे बडा दबंग..।।
हर गलती कि नही मिलती माफी..
साजिश के अमन पे जहर नही था काफी..
कई बार अपने भी लढे थे जिसके संग..
तोडे जो हर साख को वो है सबसे बडा दबंग..।।
शेर शिवबा का छावा था..
उबलता हुआ लाव्हा था..
डर जाता जिसे देख के रण रण..
धरति फाड के निकले वो है सबसे बडा दबंग..।।
एक ईतिहास ऐसा है मेरा..
भुल नही पायेगा संसार सारा..
इन्सान तो इन्सान भगवान भि रह गये दंग..
हा मै हि हु ईस संसार का सबसे बडा दबंग..

Saturday, June 30, 2012

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

!!एक दिवसाचा पांडुरंग ..... नक्की वाचा !!

"पंढरपूर येथील पांडूरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता, तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि, "विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील, म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, '" देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस, तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे, मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन"

त्यावर पांडुरंग म्हणाला, " ठीक आहे , पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस, काहीही झाले तरी बोलू नकोस, फक्त हसत उभा रहा"

पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळ ने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडूरंगाच्या जागी उभा राहिला.

तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरु झाले,

श्रीमंत भक्त :- "देवा मी लाखो रुपायांची देणगी दिली आहे, माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊंदे"

(त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला, पण चुकून तो आपले पैशांनी भरलेले पाकीट तेथेच विसरला, पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही, त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला .......... पुढे तेथे एका गरीब भक्ताचे येणे झाले )

गरीब भक्त:- "पांडुरंगा, हा एक रुपया मी तुला अर्पण करतो, माझी हि धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव, माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे....... देवा माझी बायको व मुले २ दिवसांपासून उपाशी आहेत, घरात अन्नाचा कण नाही, माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे, जे काही होईल ते तुझ्या इच्छे प्रमाणे होईल असा मला विश्वास आहे"

( असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते, तेव्हा देवाचे आभार माणू तो ते पाकीट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला, मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो........ गोकुळ काहीच न बोलता हसत उभाच असतो )

पुढे तिथे एक नावाडी येतो, देवाला उद्देशून तो म्हणतो, " हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे, तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे "

(असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलीसांना घेऊन तिथे येतो, तिथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकीट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो........तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो )

तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, " पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस, मी काहीच नाही केले तरी मला हि शिक्षा"

(हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते, तो विचार करतो कि स्वताहा पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते, असे म्हणून न राहवून तो पोलीसांना सांगतो कि, " पाकीट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे" ..... त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात, तेव्हा नावाडी न श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तेथून निघून जातात.)

रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो "कसा होता दिवस?"

गोकुळ म्हणतो , " पांडुरंगा मला वाटले होते कि इथे उभे राहणे फार सोपे काम आहे, पण आज मला कळाले कि हे काम किती अवघड आहे ते, ह्यावरून कळते कि तुझे दिवस हे सोपे नसतात" ....... पण देवा मी आज एक चांगले काम पण केले, असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो.

तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, " शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास, तुला मी सांगितले होते कि तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस, तुझा माझ्यावर (देवावर) विश्वासच नाही........ तुला काय वाटते कि मी भक्तांच्या ह्रुदयातील भावना ओळखू शकत नाही ???" ....... गोकुळ मान खाली घालून उभा राहतो ..........

पांडुरंग पुढे म्हणतो .........

अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसाया मध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता.

त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता, तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशांचे पाकीट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे.

त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता, तेथील वातावरण आज खूप खराब आहे, मोठमोठ्या लाटा जोराने वहात आहेत, ह्या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता, म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल.



पण तुला वाटले कि आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो, पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस, आणि नेहमी जे होते तेच आजपण झाले ..... "देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्याच त्यावर पाणी सोडतो"



तात्पर्य :- देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे ...... फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहीजे.


जय जय विठ्ठल रखुमाई

जय जय विठ्ठल रखुमाई
पंढरिच्या ह्या देवमंदिरी गजर एक होई
जय जय विठ्ठल रखुमाई
क्षेत्र असे हे परमार्थाचे
पावन जीवन हो पतितांचे
पुंडलीक तो पावन झाला प्रभु-मंगल-पायी
द्वारावतिचे देवकिनंदन
गोरोबास्तव भरती रांजण
विदुराघरच्या कण्या घेतसे श्याम शेषशायी
आसक्तीविण येथे भक्ती
प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती
चिंतन करता चिरंतनाचे, देव धाव घेई

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू, केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला मायबापा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला पांडुरंगा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा....

!! अवघे गरजे पंढरपूर !!

पाऊले चालते पंढरीची वाट.....
चंद्रभागेच्या तिरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी
जगी प्रगटला तो जगजेठी, आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुन सेवा खरी, थांबला हरि, तो पहा विटेवरी
!!जय हरि विठ्ठल!!
!!जय हरि विठ्ठल!!
पांडुरंग पांडुरंगएकादशीच ्या सर्वांना शुभेछा...!!!
विठूमाउली आपल्या सर्वाना सुख समृद्धी देवो हीच विठूचरणी प्रार्थना..!!!

Tuesday, June 5, 2012

फ़ोडुनी कोथळा छातीचा


 

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

समशेरीशी खेळ्लोय मी,
हातात भाले पाळण्यातही....
संकटांचे पहाडही मोठे,
तोडलेय मी खेळण्यातही....

दुरुनही चटका देणारा,
ताप मी जळत्या वातीचा......
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

निधडी छाती ताव मिशीवर,
फ़ेटा रुळला खांद्यावरती.....
जिथे जोडले गद्दार होते,
वार मी केले सांध्यावरती....

बाजी,दाजी,मुरारबाजी,
तान्हा,जीवा अन संताजी......
रक्त पेरले ज्या मातीवर,
त्या मातीशी नाळ माझी....

दंशण्यास शत्रुस तत्पर,
सर्प मी विलगत्या कातीचा....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

शिवसंपत्ती म्हणौन आजवर,
जपला महाराष्ट्र मीच आहे...
नजर ठेवुनी चोरण्यास हा,
शत्रुच माझा नीच आहे...

दंड ठोकुनी वेशीवरती,
रक्षिणार मी राष्ट्र सारा....
जातीपाती नाहीत जेथे,
फ़क्त प्रीतीचा असे पसारा...

जगात झेंडा उंच ज्याचा,
तोच मी मराठा ख्यातीचा.....
षंढ निजवले घावासरशी,
मीच मराठा जातीचा......

फ़ोडुनी कोथळा छातीचा,
मी मान राखला मातीचा.....
--- संतोष वाटपाडे